व्हॉट्सऍप कट्टा   

८३ वर्षांची वृद्धा पलंगावर झोपलेल्या आपल्या ८७ वर्षांच्या पतीला म्हणाली:
ऐकलंत का... मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि वाटलं की गॅरेजचं लाईट चालू आहे. गॅरेजचा लाईट बंद करशील का?
वृद्ध गृहस्थ मोठ्या कष्टाने उठले, खिडकी उघडली आणि बघितलं की पाच-सहा चोर गॅरेजचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते.
ते वृद्ध गृहस्थ जवळच्या पोलिस ठाण्यात फोन करून म्हणाले-
बघा.....माझा पत्ता लिहून घ्या. आम्ही दोघंच म्हातारे माणसं घरात आहोत. सध्या पाच-सहा चोर आमच्या गॅरेजचा दरवाजा तोडत आहेत. लवकर एखादी पोलीस टीम पाठवा. त्यावर पोलिस ठाण्यातून उत्तर आलं-
तुमचा पत्ता लिहून घेतला आहे. सध्या आमच्याकडे एकही मोकळी टीम नाही. जेव्हा एखादी टीम मोकळी होईल, तेव्हा तिला पाठवतो!
हे ऐकून वृद्ध दाम्पत्य निराश झाले, पण चोर मात्र गॅरेजचं कुलूप तोडण्यात मग्न होते.
दोन मिनिटांनी त्या वृद्धाने पुन्हा पोलिस ठाण्यात फोन केला:
ऐका... आता कोणालाही पाठवायची गरज नाही. मी त्या पाचही चोरांना गोळ्या घालून मारलं आहे.
हे ऐकून पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.
पाच मिनिटांत एक पोलीस टीम, एक हेलिकॉप्टर, एक पॅरामेडिक, तीन डॉक्टर आणि दोन अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन वृद्धाच्या घरी पोहोचली.
ते पाचही चोर लवकरच पकडले गेले.
नंतर पोलीस अधिकारी त्या वृद्धाला म्हणाले:
तुम्ही म्हणालात की तुम्ही त्या पाच चोरांना गोळ्या घातल्या, पण आम्ही त्यांना जिवंत पकडलं?
त्यावर वृद्ध गृहस्थ म्हणाले:
आणि तुम्हीही म्हणालात ना की तुमच्याकडे एकही मोकळी टीम नाही?
ज्येष्ठ नागरिकांना कमी लेखू नका!
--
पाऊस पडत नसेल तर बेडकांची लग्न लावली जात होती,
आता बेडकांचा घटस्फोट करण्याची वेळ आली आहे.
---
बिघाड
फ्रीज बिघडला. टीव्ही बंद. वाय-फाय डाऊन.
शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.
आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं! - तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.
सहा वेळा प्लग काढून लावला.
टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.
नेट कनेक्शन गायब.
सगळीकडे जणू नो सिग्नल.
तो चिडून म्हणाला,
हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय.
त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.
ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,
काय झालं?
काय झालं? बघ ना, फ्रीज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये?
ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडी थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.
ती म्हणाली-
तरी मी चालूच आहे ना हेच पुरेसं नाही का?
क्षणभर तो गोंधळला.
काही क्षणातच त्याच्या चेहर्‍यावर एका जाणिवेचा प्रकाश पडला.
त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.
फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं...
टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही...
नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या
पण ती? ती अजूनही सकाळी उठून उठून सगळं करत होती.
गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं
सगळं ’नॉर्मल’ चालू.
ती बिघडत नाही? ती थकत नाही?
ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता. तरी मी चालूच आहे ना हेच पुरेसं नाही का?
ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं.जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,
ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?
ती तापातही उठते. पाळीच्या दुखण्यातही काम करते.
मनात राग असला तरी चेहर्‍यावर हसू ठेवते.
सासूबाई टोचून बोलल्या तरी चूप राहते.
कारण हे घर तिचं आहे ती ‘चालू’ ठेवते.
तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला. काही वर्षांपूर्वी तो नवीन नोकरीला लागला होता.
तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.
ती लग्नानंतर शहरात आली, नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा पण एकही तक्रार नाही.
सगळं ती शिकत गेली.
रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची. त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.
एकदा ती तापात होती तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.
तो म्हणाला होता, आराम कर ना थोडा ती म्हणाली होती, तू कामावर जातोस, मी घरी राहते आराम माझ्या वाट्याला नाहीच.
आणि आत्ताच तो फ्रिज उघडून पाहतो, कसं जमवायचं आता सगळं? पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं-
माझ्या आयुष्याचे तपमान बिघडत असताना किती वेळा हिने ’फ्रीज’सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय!
तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो. ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत. कधी बिघडशील गं तू? तो हळूच म्हणतो.
ती थांबते. थोडा वेळ शांत.
मग म्हणते- बिघडले होते पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला! त्याच्या छातीत काहीतरी धडधडतं.
दुपारी...
तो स्वतः स्वयंपाकघरात जातो. मुलाला विचारतो, तुला सँडविच खायचंय का?
मुलगा म्हणतो, पप्पा, तुम्ही बनवाल?
तो म्हणतो, हो, आई विश्रांती घेत आहे.
ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो-
उद्या काय? पुन्हा मीच चालू?
तो म्हणतो, नाही. आता मीही चालू राहीन.
रात्री... ती शांत झोपलेली असते. तो तिच्या पायाशी चादर घालतो. लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.
आणि स्वतः मोबाइलच्या नोट्समध्ये लिहितो-
तू चालू होतीस म्हणून घर चाललं.
पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू कारण आता समजलंय-
तू बिघडलीस तर मीही संपलो!
या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो. पण जी व्यक्ती रोज चालू आहे - आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?
तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.
कारण ती जर एक दिवस खरंच शट डाऊन झाली,
तर घर चालणार नाही फक्त ’जगणं’ चालू राहील पण त्यात ’जीव’ नसेल. घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाइन करू शकत नाही.
- तृप्ती देव  (फेसबुकवरून साभार)
---
एकदा का चाळीशी पार केली की ’जास्त शिकलेला’ आणि ’कमी शिकलेला’ दोघेही सारखेच ...
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)
पन्नाशीनंतर तर ’सुंदर’ आणि ’कुरूप’ हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच (कोण किती का सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )
साठीनंतर तर ’मोठी पोस्ट’ आणि ’लहान पोस्ट’ असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच (निवृत्तीनंतर तर ऑफिसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)
सत्तरी पार केल्यानंतर ’मोठे घर’ आणि ’लहान घर’ असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच
(सांधेदुखी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले की बसण्यापुरती जागा असली तरी पुरे.) ऐंशीनंतर गाठीशी ’भरपूर पैसा’ असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच (जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न उरतोच) नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर ’झोपणे’ आणि ’उठणे’ यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच (कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच) अजून शंभरी पार करायची इच्छा आहे का? जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.
लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत 
तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.
---
जगातील काही नमुने असलेली लोक...
१ - जे बसमध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
२ - जे फेसबुकवर स्वतःच्या पोस्टला स्वतःच लाईक करतात..
३ - जे स्वतःच्या एका मेल आयडीवरुन दुसर्‍या मेल आयडीवर 
स्वतःच मेल पाठवतात..
४ - मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!

Related Articles